जळगांव येथील विद्यापीठातर्फे आयोजित अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत संपन्न.
जळगाव दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने “मेरा युवा भारत” व “नेहरू युवा केंद्र” यांच्या मार्फत दि.13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान “अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम” केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यांनी यावेळी जळगांव व मुंबई येथील प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.