जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या २ किलोमीटर अंतरातील तहसीलदारांच्या बनावट सह्यांसह ४३ बोगस दाखल्यांचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ.
चौकशी होवून गुन्हे दाखल होणार ..?
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज, जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात तब्बल ४३ प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणामुळे बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्याच्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून महापालिका आणि तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार आहेत.अशी माहिती खुद्द जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात अवघ्या १० ते १२ दिवसांत ५० प्रकरणे दाखल झाली होती,त्यातील ४९ जन्मदाखले आणि १ मृत्यू दाखला होता.मात्र कर्मचारी तपासणी करत असताना तहसीलदारांच्या स्वाक्षरी बाबत शंका निर्माण झाली. चौकशी दरम्यान फक्त ७ दाखल्यांवर खऱ्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले,तर उर्वरित ४३ दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या.त्यामुळे हा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राज्यात या आधीही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्म- दाखल्यांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार समोर आले आहेत.मालेगावमध्ये अशाच प्रकारच्या बोगस दाखल्यांमुळे ५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे जळगावातील या प्रकरणातही बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर,जळगाव महापालिकेने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.तसेच तहसीलदार कार्यालयाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अशाच प्रकारे यावल तहसील मधील तत्कालीन आणि यावल येथून बदली झाल्यानंतर लाचखोर झालेले तहसीलदार महेश पवार यांच्या यावल तहसील मधील कालावधीत निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी बेकायदा तहसीलदारांचे अधिकार वापरून स्वतः १५५ चे अनेक प्रकारणे हाताळून आपल्या स्वतःच्या स्वाक्षरीने आदेश दिले आहेत त्याची सुद्धा चौकशी झाल्यास तत्कालीन तहसीलदार महेश पवार आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या कालावधीतील अनेक बोगस प्रकरणी समोर आल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा महसूल विभागात चर्चा आहे.