नार्मदाची औलादच निवडणूकीत धर्माच्या नावावर मत मागतात : बच्चुभाऊ कडू यांचे प्रतिपादन !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अनिल चौधरी एक सच्चा कार्यकर्ता आहे. अनेकदा विविध मागण्यांसाठी ते प्रयत्नशील राहिले. जे नामर्दाची औलाद असतात तेच निवडणुकीत धर्म आणि जात आणतात. काम करणारा कधीही जात-पात आणत नाही असे प्रतिपादन प्रहारचे बच्चु भाऊ कडू यांनी रावेर येथील प्रचार सभेत केले आहे .येथे पंजावाला कुठे गायब आहेत त्याला पहिले शोधा, इतका झोपणारा माणूस मी आजवर पाहिला नाही. भाजपवाले तर फक्त धर्माचे नाव करून मते मागताय पण जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देणार असल्याचे ही प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आ. बच्चू कडू यांनी केले.रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ. बच्चू कडू यांची रावेर येथे भव्य सभा आयोजित केली होती. त्यासभेत त्यांनी महायुती आणि महाआघाडी वर हल्ला बोल चढविला. सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
आमदार बच्चू कडू म्हणाले की, गेल्या ७५ वर्षात काँग्रेस आणि भाजपने आलटून पालटून सत्ता भोगली मात्र आजपण आमच्या शाळा चांगल्या झाल्या नाही. आम्ही कोणत्याच नेत्यांना घाबरत नाही, आम्हाला कोणतीही चिंता नाही. माझ्यावर जनतेसाठी 350 गुन्हे दाखल आहेत. 75 वर्षात तुम्ही शाळा चांगली करू शकले नाही. लाज नाही वाटत का? इथे आर्थिक विषमता वाद सुरू आहे. श्रीमंत आणि गरीबाची शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था वेगवेगळी आहे. भाजप-काँग्रेसवाले धर्माच्या नावाखाली मते घेतात मी सेवेच्या नावाने मते घेतो, असे ते म्हणाले.
अनिल चौधरी झाले भावूक !
मी मतदार संघात एक-एक कार्यकर्ता जोडला. सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडे गाडीत पेट्रोल भरायला देखील पैसे नसतात, असे बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी भावूक झाले होते. माझ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आमिष दाखवले जात आहे मात्र तो स्वाभिमान आहे म्हणून विकला जाणार नाही. माझ्यासमोर बसलेला जनसमुदाय माझा धर्म आणि समाज आहे. तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते. धर्म, जातीचे राजकारण घराणेशाहीने सुरू केले आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल होणार नाही इतकी शांतता होईल. रावेरमध्ये नेते भाजप, काँग्रेस मिळून जातीवाद करतात. रावेरचा कोणताही विकास झालेला नाही. आज इथे जमलेली जनता पैसे देऊन आणलेली नाही. काही लोक माझी बदनामी करतात. भविष्यात आणखी अफवा पसरवतील मात्र त्यावर विश्वास न ठेवता बुधवार, २० रोजी अनुक्रमांक ४ बॅट चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन अनिल छबिलदास चौधरी यांनी केले.
कार्यकर्त्यांना संस्थानिक करू, माजी आ. संतोष चौधरींनी दिला शब्द !
गेल्या पंचवार्षिकला आमची टेस्ट मॅच होती यंदा वन डे आणि टी ट्रेंटी सामना आहे. मी पहिल्यांदा अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली तर ३३ हजार मते मिळाली होती, अनिल भाऊंना तर ४५ हजार मते मिळाली. ५ वर्षात अनिल चौधरींनी अनेक लोकांना जोडले, आज गावागावात त्यांचे समर्थक आहेत. स्थानिक नेत्यांनी आजवर केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या. आम्ही कधीही संस्था उभारल्या नाही. भविष्यात देखील संस्था उभारणार नाही, पण कार्यकर्त्यांना संस्थानिक करू, असा शब्द माजी आ. संतोष चौधरी यांनी दिला.