नाशिक पाठोपाठ धुळ्यात ही घडली सामुहिक आत्महत्या !
नाशिक खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नाशिक शहरात एकाच परिवाराने सामुहिक आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना नुकतेच खान्देशातील धुळ्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे शहरातील देवपूर भागात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली समोर आली आहे.
धुळे शहरातील देवपूर भागातील प्रमोद नगरातील समर्थ कॉलनीत गीरासे कुंटूबातील पती गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी व दोन्ही मुले विषारी औषध प्राशन केलेल्या स्थितीत आढळून आले. शेजाऱ्यांना मुंबई येथे जात असल्याचे कारण सांगून गिरासे कुटुंबीयांनी जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण मात्र, समजू शकले नाही.मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीणसिंग मानसिंग गिरासे ( वय ५२), दीपांजली प्रवीणसिंग गिरासे ( वय ४४), सोहम प्रवीण गिरासे ( वय १८) व मितेश प्रवीण गिरासे ( वय १३) अशी चौघा मृतांची नावे आहेत. प्रवीणसिंग गिरासे यांचे शहरात पारोळा रोडवरील आर. आर. पाटील व्यापारी संकुलात कामधेनू अॅग्रो (फर्टिलायझर) एजन्सी आहे. प्रवीणसिंग गिरासे यांच्या भगिनी संगीता योगेंद्रसिंग राजपूत या गिरासे यांच्या घरी आल्या असता सदर घटना त्यांच्या निदर्शनात आली. दोन ते तीन दिवसांपूर्वी चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कारण घरात दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.