Sunday, April 27, 2025
Homeजळगावपैसा आणि प्रतिष्ठेच्या लालचेने १० ते १२ लाख जनतेच्या आरोग्याशी खेळणार का.?ललितकुमार...

पैसा आणि प्रतिष्ठेच्या लालचेने १० ते १२ लाख जनतेच्या आरोग्याशी खेळणार का.?ललितकुमार चौधरी.

जिल्हाधिकारी जळगाव,महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ यांना एक महिन्याच्या आत अहवाल सादर करायचे आदेश.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वाघुर धरणातील बुडीत क्षेत्रात पाण्याच्या मधोमध महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ ह्यांचे उपलब्ध निधीने मौजे गारखेडा गट न. १२१ शिंगायात शिवार ता. जामनेर जिल्हा जळगाव येथे नव्यानेच पर्यटन विकास लग्न मंडप,रिसोर्ट,निवासी तंबू,झोपडी हॉटेल्स,पंचतारांकित कार्यक्रमाचे आयोजनास सुसज्ज असे दालन ई. पक्क्या स्वरुपाची २५-४० कोटीची बांधकामे गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरु आहेत.व त्यांचा व्यावसायिक वापर देखील सुरु असल्याने या उद्योगामुळे त्या ठिकाणी,म्हणजे वाघुर धरणात जाणारे वापराचे घाण दूषित अशुद्ध पाणी जनतेला मिळणार असल्याने यात अंदाजे १० ते १२ लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणार आहेत का.? अशी लेखी तक्रार ललितकुमार चौधरी यांनी संबंधित विभागाकडे आणि जिल्हाधिकारी जळगाव तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ,मुख्य प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे दिली आहे.

सदरची तक्रार राष्ट्रीय हरित लवाद खंडपीठ पुणे यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने जिल्हाधिकारी जळगाव, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, मुख्य प्रधान वनरक्षक नागपूर यांनी एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश झाले आहेत.दि.१५ /१६ मार्च २०२५ गायिका वैशाली सामंत,गायक आणि संगीतकार असलेले अजय अतुल यांचा सार्वजनिक आयोजित कार्यक्रम झाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती.दैनंदिनी पर्यटकांचीवर्दळ असते.भविष्यात अशीच वर्दळ कार्यक्रम होत राहतील.मुख्यत्वे सांगायचे झाले तर वाघुर धरणातील पाणी वापर हा इतर औद्योगिक वापर वगळता जामनेर शहर,शेंदुर्णी शहर,नेरी व इतर ०७ गावे,वाघनगर सावखेडा,आणिजळगाव शहरातील औद्योगिक व जळगाव शहर येथे पिण्याचे पाणी म्हणून होत आहे.राष्ट्रीय हरित लवाद मुख्य खंडपीठ दिल्ली दावा क्र. ३२५/२०१५आणि त्यात समाविष्ट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांची मार्गदर्शक तत्वे व तत्समनिर्णयानुसार कुठल्याही पाणी बुडीत क्षेत्रात बांधकाम अवैध ठरविले आहे तथा प्रतिबंधित आहे. आणि सदर विवादित प्रकल्प क्षेत्र हे वाघुर धरणाच्या जलाशयाचे बुडीत क्षेत्र आहे.या छोट्याश्या बेटावर असंख्य वृक्षतोड करण्यात आली.जैव विविधता नष्ट करण्यात आली.अशा प्रकारे जनतेचा वावर हा धरणाच्या पाणी प्रदूषणास कारणीभूत होत नसेल काय.?शासन निर्णय दि. ०२ मार्च २०१५ अन्वये जलसंपदा विभागाला ना हरकत पत्र देण्याचे अधिकार नसतांना संबंधित प्रकल्पाला तापी खोरे विकास महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र दिले गेले.

मौजे गारखेडा पर्यटन प्रकल्प हा अवैध ठरतो तसेच जलसंपदा विभागाची जलाशयातील मधोमध बुडीत क्षेत्राच्या जागेवर झालेली व होवू घातलेली बांधकामे, जलाशयातील बिना परवानगी सफारीसाठी कोटी रुपयांची जल सफारी बोटी,रहिवास बोट खरेदी व जलाशयात वापर बेकायदेशीर आहे.जागा कुणाची,पैसा कुणाचा,बांधतय सार्वजनिक बांधकाम विभाग,कुण्या शासकीय निमशासकीय संस्थेचा प्रस्ताव नाही मग निधी मंजूर कसा झाला,या सर्व प्रकल्पाचा मालक कोण? कोणता विभाग ? त्यामुळे या अवैध खर्चाची जबाबदारी कुणी स्विकारावी ?पर्यटन स्थळावर जाण्याचा पोहोच रस्ता जंगलाच्या मधोमध कं.नं ४९४ मधून बेकायदेशीर आहे.वन विभाग सुस्त आहे,की कुणाचा दबाव आहे.


एकाच मक्तेदाराला जवळपास एकाच दराने सर्व निविदा मिळतात विशेष म्हणजे त्याच मक्तेदार सदस्य असलेल्या कंपनीला म्हणजेच “backwood Emeral Resort ला चालविण्याचा मक्ता दिला जातो.खरं सांगायचे झाले तर आपल्याच जिल्ह्यातील गारखेडा ता.जामनेर येथील मूळ निवासी असलेले प्रशांत सोनवणे हे आपल्या वैशिष्टपूर्ण गुणांनी जिल्ह्यात मध्यंतरीचा एक दोन वर्षाचा कार्यकाळ वगळता गेल्या १२ ते १४ वर्षापासून जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता ते अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागचा कार्यभार सांभाळत आहे त्यांचे योग्यतेनुसार त्यांची अधिवेशन काळात बदली
होवूनही पंधरा दिवस स्थगिती मिळालेली आहे.ह्यावरून त्यांची जिल्ह्याला अशा कर्मप्रधान व्यक्तीची आवश्यकता किती आहे हे दिसून येते. अश्या कर्तव्यदक्ष सर्वांना सोबत घेवून चालणाऱ्या अधिकारीचे एव्हढे चुकणे शक्य नाही. कारण हि चूक नाही तर षडयंत्र श्रीमंतांचे चोसले पुरविण्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी जीविताशी खेळ आहे असे मला वाटते. म्हणूनच मी मा.
जिल्हाधिकारी जळगाव मुख्य प्रधान वन संरक्षक,प्रधान सचिव पर्यटन,म.रा.प्र.नियंत्रण मंडळ सायन यांना लेखी तक्रार देवूनही कार्यवाही न झाल्याने मा. राष्ट्रीय हरित लवाद खंडपीठ (The NGT (WZ) Pune) येथे योग्य मार्गदर्शन तथा आवश्यक असल्यास बंदी व्हावी यासाठी दावा क्र २३/२०२५ दाखल केलेला आहे. माझी अपेक्षा हीच की वरील नमूद गावातील १०-१२ लक्ष जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे. ह्या संदर्भात दि. ६ मार्च २०२५ रोजी सुनावणी होवून मा. जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जळगाव,महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, प्रधान
मुख्य वनरक्षक यांना एका महिन्याचे आत अहवाल सादर करण्याचे आदेश झाले आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या