शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी राऊत यांना दिले निवेदन; समस्या नाही सुटल्यास आंदोलनाचा इशारा
वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी– शहरात नवीन भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्वरित टाकावी, नवीन नळ कनेक्शन देताना कुठलीही आडकाठी नागरिकांना करू नये, नागरी समस्या लवकर सोडवा अशा विविध समस्याचे निवेदन आज मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजता नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
वरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव शहरात नवीन पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन त्वरित द्यावे, गावात आणि कॉलनी भागात पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शनसाठी घेण्यासाठी नागरिकांना नगरपरिषदमध्ये चकरा मारावे लागतात. त्या नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन द्यावे आणि कोणत्याही प्रकारची आळ खाटी त्यांना घालू नये. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम काही भागात पूर्ण झाले असून त्या पाईपलाईन मधून नागरिकांना पाणी
सोडण्यात यावे. गावात आणि कॉलनी परिसरात घंटा गाडी नियमित येत नसून सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटार काढणारे स्वच्छता कर्मचारी यांना गटारीची स्वच्छता करण्यास सांगितल्यास ते महिलांशी हुज्जत घालून, ते म्हणता तुम्ही आमची कंप्लेंट करा अशा मगरूरीच्या भाषेत ते महिलांशी अरेरावी करतात. दररोज कचरा काढणारे आणि घंटागाडी नियमित येऊन या नागरी समस्या सोडवाव्या. समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
समस्यांचा वाचला पाढा
मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्याजवड जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर आणि पदाधिकारी यांनी घंटा गाडी, स्वच्छता, पाणी पुरवठा, नळ कनेक्शन, नागरी सुविधा समस्यांचा पाढाच वाचला. मुख्याधिकारी राऊत यांनी तत्काळ या समस्याचे निराकरण होईल असे आश्वासन शिवसेना पदाधिकारी यांना दिले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका संघटक सुरेश चौधरी, जिल्हा संघटक निलेश सुरडकर, वरणगाव शहर संघटक दुर्गेश बेदरकर, अल्प संखांखं शहरप्रमुख अशफाक खाटीक, युवा उप शहरप्रमुख पंकज पाटील, राहुल इंगळे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.