Saturday, April 19, 2025
Homeजळगावतालुका हादरला : डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय चिमुकली ठार..!

तालुका हादरला : डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात २ वर्षीय चिमुकली ठार..!

आईजवळ झोपलेल्या २ वर्षाच्या मुलीला बिबट्याने उचलून नेऊन लचके तोडत केले ठार !

पश्चिम वनपरिक्षेत्रात दुसरी घटना घडल्याने पूर्व – पश्चिम क्षेत्रासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सातपुडा पर्वतापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव येथील यावल वन विभाग उपवन संरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील यावल वनपरिक्षेत्र पश्चिम भागात गेल्या महिन्या दीड महिन्याच्या कालावधीत बिबट्याने एका बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा एका दोन वर्षाच्या लहान मुलीला उचलून नेऊन तिचे लचके तोडून ठार केल्याने यावल तालुक्यात शेतकरी वर्गासह इतर सर्व क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने पश्चिम वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये निष्क्रिय ठरत असल्याने याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पश्चिम वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आज रात्री एक वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात मेंढपाळ कुटुंबातील बालिकेला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली.त्यामुळे वनपरिक्षेत्र पश्चिम आणि पूर्व भागासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.आज घडलेल्या घटनेची माहिती अशी की यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये मेंढपाळांचे ३ कुटुंब गेल्या ५ दिवसापासून प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मुक्कामी होते. गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई या २ वर्षाच्या चिमुकलीला, मुलीला तिच्या आईच्या कुशीतून म्हणजे आईजवळ झोपलेली असताना बिबट्याने उचलून नेऊन केळीच्या बागेत घेऊन गेला आणि तिथे त्याने त्या लहान बालिकेचे लचके तोडले त्यामुळे बालिका जागीच ठार झाली.कुटुंबीयांनी आरडाओरडा केली असली तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पळून गेला.
दरम्यान,या दुर्घटनेची माहिती मिळताच यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागते.यातच बिबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतात शेतमजूर काम करण्यासाठी नकार देत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला असून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. या संताप जनक घटनेची माहिती मिळतात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी निष्क्रिय अशा वन अधिकाऱ्यांना आपल्या शिवसेना स्टाईलने
चांगलेच धारेवर धरले आणि बिबट्यावर तातडीने कार्यवाही
करण्याचे निर्देश दिले आहेत.ते सकाळी घटनास्थळी पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच किनगाव नजीक एक बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता.या पाठोपाठ आता बालिका ठार झाल्याने परिसर हादरला आहे.नरभक्षक बिबट्याला लहान मुलांच्या रक्ताची चटक लागल्याने बिबट्याला पकडण्याची
मागणी आता जोर धरू लागली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या