भावी पदाधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले गाव,मतदारसंघ स्वच्छ करून आदर्श घडवावा : डॉ. सुरेंद्रसिंग पाटील !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद. पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका लवकरच होण्याच्या मार्गावर आहे.महानगरपालिकेत महापौर व नगरसेवक पदासाठी तसेच नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य याकरता निवडणूक होण्याच्या मार्गावर असून आपण ज्या भूमीवर जन्मलो व तिच्या सहकार्याने आपण सुरक्षित रित्या राहत आहे परंतु काही अपरिहार्य कारणामुळे भूमातेवरील असलेली निसर्ग संपत्ती याची छेडछाड मोठ्या प्रमाणात झाली आहे असे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले आहे .
त्यामुळे आपणास सद्यस्थितीत पर्यावरणाचे संतुलन नसल्यामुळे आपणास अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे .
सर्व पक्षाचे या पदासाठी उभे राहणारे भावी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी आपले शहर, गाव, आपला वार्ड,मतदारसंघ यातील रस्ते सार्वजनिक जागा, शाळा, दवाखाने संगोपना सहित वृक्षारोपण करून निरोगी व सुदृढ राहण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्व सजीवांना आवश्यक असलेले संगोपना सहित विविध प्रकारच्या ऑक्सीजन युक्त वृक्षाचे वटवृक्ष होणारे दीर्घकाळ टिकणारे तसेच विविध प्रकारचे फळांची झाडे आवश्यक असलेले फुलझाडे आपल्या गावातील वार्डातील नागरिक आपले मतदार यांनी निरोगी व सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी आपण स्वच्छ व हरितमय करावे व एक आदर्श घडवावा.
आपण जरी निवडणूक हरलो तरी कायमस्वरूपी हे वृक्ष आपली आठवण आपल्या मतदारांना गावाला करून देईल . झाडे लावू झाडे जगवू परिसर स्वच्छ ठेवूया हीच प्रत्येकाने निसर्गाप्रती जबाबदारी पार पाडू या पर्यावरण संतुलनासाठी मदत करण्याचा संकल्प करा असे आवाहन करण्यात आले आहे .