Saturday, April 19, 2025
Homeजळगाव‘ उन्हाळी तीन दिवसीय संस्कारमाला’ शिबिराचे थोरगव्हाण येथे उद्घाटन – शिक्षण, संस्कार...

‘ उन्हाळी तीन दिवसीय संस्कारमाला’ शिबिराचे थोरगव्हाण येथे उद्घाटन – शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम ! 

‘उन्हाळी तीन दिवसीय संस्कारमाला’ शिबिराचे थोरगव्हाण येथे उद्घाटन – शिक्षण, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम ! 

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण यांच्या वतीने उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, शिस्त, मूल्यांची जाणीव व व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी “उन्हाळी संस्कारमाला” या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात शिक्षणाबरोबरच संस्कार व आधुनिकतेचा त्रिसूत्री संगम घडवण्याचा सांस्कृतिक समिती कडून हा प्रयत्न केला जात आहे.

पुष्प क्रमांक १ शिक्षणाची संस्कारमूल्ये”

शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सत्राचा विषय होता “शिक्षणाची संस्कारमूल्ये”. या विषयावर डॉ. जगदीश पाटील सर यांनी प्रभावी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली.
त्यांनी शिक्षणातून आत्मसात होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्कार व नितीमुल्ये व्यक्तीमत्व विकासाचा भक्कम पाया आहे . आई वडिल गुरुजनांचे सांगणे ऐका .सुजान नागरीक व्हा असे आवाहन केले आहे.त्यामुळेच कुटुंब , गाव , राज्य , देश निकोप प्रगती साध्य करू शकेल जगात शांतता नांदेल असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री ए. पी. बाऊस्कर सर शाळेचे माजी मुख्याध्यापक होते, प्रास्ताविक श्री डी. के. पाटील सर, तर वक्त्यांचा परिचय श्री एम. के. पाटील सर यांनी करून दिला .प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री रमेशभाऊ इंगळे (तासखेडा), जि.प शाळा . शालेय समिती सदस्य श्री लक्ष्मणभाऊ कोळी (तासखेडा) आणि रावेरचे शिक्षणाधिकारी श्री विलास कोळी, श्री दिलीप पाटील, श्री नानाभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.श्री विलास कोळी सर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम “काळाची गरज” असल्याचे नमूद केले. परीक्षेनंतरची सुट्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे .याप्रसंगी संचालक मधुकर कोल्हे , नंदकुमार चौधरी , रविंद्र चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला . व पूर्ण वेळ उपस्थिती दिली .उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांचे दातृत्वातून शिबिरार्थी सहभागींना भोजनाची सेवा देण्यात आली होती .

पुष्प क्रमांक २ – “आजचे आधुनिक व बदलते शिक्षण”

शिबिराच्या दुसऱ्या सत्रात दुसऱ्या पुष्पात “आजचे आधुनिक व बदलते शिक्षण” या विषयावर चिंतन झाले.प्रमुख वक्ते श्री प्रमोद आठवले सर यांनी नव्या शैक्षणिक प्रणाली, कौशल्याधारित शिक्षण आणि डिजिटल युगातील विद्यार्थ्यांची भूमिका यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नंदकुमार एकनाथराव चौधरी संचालक होते, वक्त्यांचा परिचय श्री एन. बी. चौधरी सर, सूत्रसंचालन श्री पी. सी. कचरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री डी. के. पाटील सर यांनी व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री नामदेव रामा कोळी (रणगाव) यांनी मोठ्या मनाने विद्यार्थ्यांना 100 वह्या व 100 पेन देण्याचे दातृत्व दिले . आणि शालेय समिती सदस्य जि प शाळा . श्री दीपक सोनू तायडे (रणगाव) उपस्थित होते.विशेष उपस्थिती – दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष श्री उमाकांत बाऊस्कर, संचालक श्री नंदकुमार एकनाथराव चौधरी, तसेच श्री मधुकरराव कोल्हे आणि श्री रवींद्र काशिनाथ चौधरी यांनी सत्रास गौरव प्राप्त करून दिला.
संस्थेचे साचव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व कार्यकारी मंडळ यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत .
तृतीय पुष्पात वेलनेस फाउंडेशनचे प्रा. निलेश गोरे सर “यशाचा सक्सेस मंत्र” देणार असून, चतुर्थ पुष्पात प्रा. दिलीप भारंबे (जळगाव) “हसत-खेळत प्रयोगातून विज्ञान” या विषयावर विद्यार्थ्यांना विज्ञानाची मजा अनुभवायला लावणार आहेत.विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री डी. के. पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिराची उजळणी घडवत आहे.
पालक वर्गातूनही या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या