भुसावळात सोलर ग्राहकांना विज मंडळाचा धक्का : घेतलेल्या युनिटचे पैसे मिळाले नाही परंतु रक्कमेचा भुर्दंड !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरात महावितरणच्या सॉफ्टवेअर त्रुटीमुळे चुकीची हजारो रुपयांचे वीजबिले मिळत आहेत, ज्यामुळे त्यांचे कनेक्शन कापले जात आहेत. हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवणाऱ्या हजारो नागरिकांना प्रभावित करत आहे. सोलर ग्राहक या कारणाने संकटात सापडला आहे.
समस्या काय?
नेट-मीटरिंग प्रक्रियेत जनरेशन (सोलरमधून तयार होणारी वीज) शून्य दाखवली जाते, फक्त वापरलेली वीज मोजली जाते. युनिट मोजले गेले तरी पैसे मिळत नाही .गेल्या अनेक महिन्यांपासून हा घोळ सुरू आहे, ज्यामुळे झीरो बिल ऐवजी हजारो रुपये बिले येतात आणि ग्राहकांना थकबाकीदार ठरवले जाते . सोलर ग्राहकांनी विज बिला पासून सुटका व्हावी व विज विक्रीतून दोन पैसे मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून जर कंपनी कडून पुन्हा अडवणूक होत असेल तर ग्राहकाने काय करावे हा प्रश्न आहे .
शासनाने सोलर बसविण्यासाठी सबसिडी दिली व प्रोत्साहन योजना आणली त्यावेळी किती वॅट चे सोलर बसवावे असा नियम नव्हता परंतु मागील महिन्या पासून फक्त महाराष्ट्रात युनिट वापर व सोलर वॅट याबाबत नियम ठरवुन ग्राहकांना मोठा झटका ग्राहकांना दिला हाच नियम दाखवुन मंडळ सोलर ग्राहकांना विकलेल्या युनिटचे पैसे देणे दूरच पण इतर रक्कम वसुल करण्याच्या तयारीत आहे .
इतर ग्राहकांना ही स्मार्ट मिटर लावण्या साठी विविध कारणे दाखवुन जुने मिटर काढून स्मार्ट मिटर लावले जात आहे.
शहरात हजारावर ग्राहक प्रभावित असून, दररोज तक्रारी येत आहेत.महावितरणची भूमिका टीओडी स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करून मुंबईतून ऑटो डिस्कनेक्शन केले जाते,पूर्वसूचना न देता. रिकनेक्शनसाठी बिल दुरुस्तीची मागणी करतात, पण तांत्रिक दोष महावितरणचा असल्याने ग्राहक भ्रष्टाचाराचा बळी ठरत आहेत. सॉफ्टवेअर लवकरच सुधारणा होईल, असे सांगितले जात आहे. पण सुधारणा होत नाही या कारणाने सोलर चे ग्राहक प्रचंड तनावाखाली आहेत. दररोज घरगुती ८-१३ रुपये/युनिट, व्यावसायिक १८ रुपये/युनिट असूनही सेवा निकृष्ट आहे.उपाय सुचनाग्राहकांनी तक्रार नोंदवावी, बिलिंग शिबिर घ्यावे आणि ऑटो डिस्कनेक्शन थांबवावे अशी मागणी आहे. स्मार्ट मीटरिंग आणि वीजचोरीवर कारवाई आवश्यक, अन्यथा ‘वीज लूट’ चालू राहील . सोलर ग्राहकांची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे .

