भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयावर विविध मागण्यासाठी सीआरएमएसचा मोर्चा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या बाबत सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपई यांच्या आदेशानुसार भुसावळ रेल्वे , स्टेशन पासून 22 रोजी भुसावळ मंडळ रेल प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत समस्या तथा , कर्मचाऱ्यांचे शोषण व अधिकारीच्या मनमानी विरुद्ध हा मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व वी. के. समाधिया यांनी केले.
कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात . रिक्त जागा सरेंडर करु नये. नवीन पदासाठी माहिती देण्यात यावी. रेल्वे कर्मच्याऱ्यांच्या निवासाची सुधारणा करण्यात यावी. जीडिसीई ची नोटिफिकेशन्स पुन्हा काढण्यात यावी. एन ओ सी प्राप्त कर्मचाऱ्यांना इंटर रेल्वे ट्रान्सफर साठी लवकरात लवकर रिलीव करण्यात यावे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला. मोर्चामध्ये मंडळ सचिव एस बी पाटील मंडळ समन्वय ए के तिवारी मंडळ संघटक पी के रायकवार मंडळ कोषाध्यक्ष एस के दुबे मंडळ कार्याध्यक्ष ए एस राजपूत महिला मंडळ अध्यक्ष अलका चौधरी मुख्यालय कार्यसमिती
सदस्य दीपक शर्मा सुरेश लखोरे वीरेंद्र पटसरिया उल्हास जोशी नितीन पवार मोहम्मद इरफान आर एस वाजे पंकज गुप्ता अजित अमोतकर वाल्मीक बोरसे नागेश, शुक्ला संजय बारंबे जयेश ढाकणे अजय महाजन उमाकांत बावस्कर दीपक डांगे गणेश सिंग भूपेंद्र रणधीर नागदेव महिंद्र सपकाळे एच एस सरोदे ईश्वर बाविस्कर सुनील नवगिरे सुनीलाल गुप्ता चौथीले आनंद गांगुर्डे महिंद्र चौथमोल इत्यादी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारच्या नवीन पैंजण योजना व कामगार विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला आहे सरकार विरुद्ध लढण्यासाठी कामगारांनी एक होऊन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे या मोर्चा सर्व शाखा सचिव शाखा अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली .