औरंगाबाद खंडपीठाकडून तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याची सूचना.
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – दि.,२६ मंडळ अधिकारी तसेच ग्राम अधिकारी यांच्याविरुद्ध दप्तर दिरंगाई कायदा २००६ प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती आणि आहे परंतु कार्यवाही न झाल्याने अर्जदार दि.१७ नोव्हेंबर २०२५ पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले.तसेच दिलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याची सूचना औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी जळगाव यांना दि. १७ ऑक्टोबर २०२५ दिली.
याबाबत सविस्तर माहिती असे की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील विक्रम इच्छाराम कोळी यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
तक्रार अर्जात नमूद केले आहे की कै.इच्छाराम सखाराम कोळी यांचा मृत्यू झाल्यानंतर अट्रावल शिवारातील गट क्र. १८१ वर वारस नोंद करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह २७ जून २०२५ रोजी ऑनलाइन अर्ज केला आहे. परंतु तलाठी यांचा पंटर योगेश चौधरी यांनी वारस नोंद करणे करता १० हजार रुपयाची मागणी केली होती म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे १० जुलै २०२५ रोजी तक्रार केली.तक्रार अर्जाचा परिणाम म्हणुन तहसिलदार यावल यांनी मंडळ अधिकारी भालोद आणि ग्राम अधिकारी अट्रावल यांना सूचना केल्यावर दि.१६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता संबंधीत तलाठी यांनी मला अट्रावल येथील तलाठी कार्यालयात तक्रार झाल्यास बोलवुन वारस नोंद करीता पुन्हा ऑनलाईन फार्म भरुन घेतला आहे. म्हणजे दि.१७ जून २०२५ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत सामनेवाले तलाठी यांनी माझ्या अर्जाचा संबंधी कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती हे सिध्द झाले आहे.
तलाठी यांनी दि.१६ जुलै २०२५ रोजी माझा वारस नोंद नं.२१८६ ही मंजुरसाठी टाकल्यानंतर सदर वारस नोंद मंडळ अधिकारी यांनी कागदपत्रात तफावत दिसते असे मोघम कारण नमुद करुन सदर नोंद नं. २१८६ नामंजुर केली.मंडळ अधिकारी आणि ग्राम अधिकारी यांनी शासकीय काम मुदतीत केले नाही त्यांचेकार्यालयात “नागरी सनद’ लावलेली नाही सदर मंडळ अधिकारी कधीच अट्रावल
गावात येत नाही वरचेवर काम करतात तसेच राजकीय पुढारी सांगतील तेच काम करता सर्वसाधारण जनतेची कामे करीत नाही.तरी मंडळ अधिकारी आणि ग्राम अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होणेस विनंती आहे.सदर कारवाईदि.९ नोव्हेंबर २०२५ पावेतो न झाल्यास मी दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी यावल तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे या बाबत नोंद घ्यावी असे तक्रारदारांने दिलेल्या लेखी अर्जात नमूद केले आहे.
याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दि १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना लेखी पत्र देऊन तक्रार अर्जानुसार चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.मंडळ अधिकारी आणि ग्राम अधिकारी तक्रारदाराच्या अर्जानुसार कार्यवाही करणार किंवा नाही.? याकडे अट्रावल ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.