आणीबाणीतील मिसाबंदी कार्यकर्त्यांचा भुसावळ भाजपतर्फे सत्कार

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
देशात १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने गौरव व सत्कार करण्यात आला. भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे आणि भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या हस्ते या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कॅबिनेट मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील संघर्ष, त्याग आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. यावेळी लोकशाही धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेधही करण्यात आला.

यावेळी जिल्हा संयोजक केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा सचिव प्रवीण इखणकर, भुसावळ उत्तर मंडळाध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण मंडळाध्यक्ष किरण कोलते, ग्रामीण मंडळाध्यक्ष गोलू पाटील, मंडळ संयोजक पिंटू कोठारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सत्कारमूर्तींमध्ये अरुण भावसार, जयंतीलाल सुराणा यांच्यासह दिवंगत कार्यकर्ते स्व. बाकीलालजी रणधीर, स्व. मुरलीधर जोशी व स्व. दत्तात्रय इखणकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार अनुक्रमे नारायण रणधीर, प्रवीण इखणकर, हर्षल जोशी यांनी स्वीकारला तसेच प्रकाश मुळे यांचा सत्कार धीरज मुळे यांनी स्वीकारला, कमलाबाई दगडू चौधरी यांचा सत्कार त्यांचे चिरंजीव ॲड. बोधराज चौधरी यांनी स्वीकारला, तर अरविंद वसंत जोशी यांचा सन्मान डी. के. कुलकर्णी यांनी स्वीकारला.

यावेळी शहर सरचिटणीस जयंत माहुरकर, पवन बुंदेले, अमोल महाजन, दिनेश नेमाडे, बापू महाजन, सुजित भोळे, राजेंद्र आवटे, राजू खरारे, कैलास पाटील, रुपेश देशमुख, ललित मराठे, किरण पाटील, चंद्रशेखर अग्रवाल,शैलेजा पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा वैशाली सेतवाल, अनिता आंबेकर, प्राची पाटील, राहुल तायडे, ऋषभ सिंग राजपूत, भावेश चौधरी, अनिल पाटील, गोपी राजपूत, योगेंद्र हरणे, नंदकिशोर बडगुजर, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, गौरव आवटे, सुजित वानखेडे, चेतन सावकारे, अमित असोदेकर, हर्षल जोशी, नकुल महाजन, उदय पाटील, रोहन वारुळकर, सोनू अग्रवाल, सचिन बऱ्हाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मोर्चा-आघाडीचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत माहुरकर यांनी केले.

