यासाठी मतदारसंघातील ठीक ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शांतता समिती सदस्यांची निवड करताना सर्व जाती धर्मातील सकारात्मक विचार व नि:पक्षपणा असलेल्या तसेच समितीत कोणत्याही एका गटाचा प्रभाव / बहुमत, वर्चस्व नसलेल्या सदस्यांची निवड करणे आवश्यक झाले आहे.शांतता समिती सदस्यांमध्ये काही २ नंबरचे विविध व्यवसाय करणारे आपला वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी उपस्थित राहतात ते जनहिताचा निर्णय घेऊ शकत नसल्याने अशा सदस्यांना तालुका,शहर स्तरावरील शांतता समितीत प्रवेश द्यायला नको. जिल्हास्तरावर शांतता समिती सदस्यांची निवड करताना तालुक्यातून किमान २ समविचारी, जात धर्माबाबत सकारात्मक भूमिका असलेल्या सदस्यांची सर्वानुमते निवड व्हायला पाहिजे अशी सुद्धा चर्चा आहे.