कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जळगांव जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश सरदार यांची नियुक्ती
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी जळगांव जिल्हा अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश सरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
त्यावेळी दादाभाऊ अभंग यांनी आव्हान केले की, संपुर्ण, जळगांव जिल्ह्यात प्रत्येक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या लढ्यात सामील होण्याची गरज आहे .
भीमा विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या जबाबदारी जळगांव जिल्हा नवयुक्त जिल्हा अध्यक्ष प्रकाश यशवंत सरदार यांची नियुक्ती करुन त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गेल्या मागील अनेक वर्षांपासून प्रकाश सरदार हे आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. प्रकाश सरदार हे प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन कंत्राटदार संघटना,भुसावळ विभागीय प्रमुख दैनिक ’बातमीदार’, उपसंपादक रेल्वे क्राइम , जिल्हा संघटक व केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा व केंद्रीय सचिव आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम इत्यादी पदांवर कार्यरत आहेत. ते भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सक्रिय सहभागी आहेत.
या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात प्रकाश यशवंत सरदार जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करीत आहेत त्यांच्या या नियुक्ती बद्दल समितीचे अध्यक्ष
दादाभाऊ अभंग, संपादक उत्तम वानखेडे, दिनेश एखारे, विनोद सोनवणे, पत्रकार प्रकाश तायडे, सुमित निकम, बाळू शिरतुरे, राहुल गाढे, संतोष कसोदे , राजेश तायडे, फेकरी गावचे माजी सरपंच राहुल वाघ, इत्यादीनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.