जगातले चांगले सत्कर्म – तहसीलदार मोहनमाला नाझीरकर.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील बोरावल गेट जवळील पद्मावती हॉलमध्ये जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य यांच्या खास उपस्थितीत संपन्न झाला.स्वस्त धान्यापासून गरजू लाभार्थी वंचित राहिला नको असे शासनाचे ध्येय उद्दिष्ट आहे,शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला जे धान्य वाटप करतात ते काम म्हणजे जगातले चांगले सत्कर्म असल्याचे यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी उपस्थित धान्य दुकानदार यांना सांगून त्यांचे उत्कृष्ट कार्य असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांच्या विविध अडीअडचणी सुद्धा ऐकून घेतल्या. तसेच पुरवठा विभाग ही स्वतंत्र वेगळी यंत्रणा असली तरी अनेक लाभार्थ्यांच्या काही तक्रारी सुद्धा तहसीलदार म्हणून कार्यालयाकडे येत असतात त्याबाबत पुरवठा विभागाला वेळोवेळी सूचना केल्या जातात.अशी माहिती सुद्धा तहसीलदार यांनी दिली.
मेळाव्यात राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडीअडचणी,समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली तसेच शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढवून ते कमिशन दर महिन्याला नियमित स्वस्त धान्य दुकानदारांना दिले तर त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडी अडचणी निरसन करण्यासाठी दुकानदारांचे संघटन फार आवश्यक आहे असा एक सूर संघटनेच्या मेळाव्यातून निघाला. मेळाव्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणी बाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्याला डीएन पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत यादव महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी राजेश अंबुसकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकारी सर्व उपस्थित होते यावल तालुक्यातील मुख्य आयोजक सुनील नेवे अध्यक्ष उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला शेख रसूल सचिव दिलीप मोरे तालुका कार्याध्यक्ष अजय कुचेकर सल्लागार नामदेव झुरकाडे नितीन माहुरकर दिलीप नेवे अमृत पाटील रतन कोळी इतर पदाधिकारी व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते व कार्यक्रमाला तालुक्यातील कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार माननीय मोहनमाला नाझीरकर उपस्थित होते मेळावा कार्यक्रम नियोजनपूर्वक उत्साहात शांततेत पार पडला व दुकानदाराचे सर्व मागणीचे व पुढील रूपरेषा हे कार्यक्रमांमध्ये ठरवण्यात आली असून येणारा काळात दुकानदाराच्या मागणीसाठी खूप मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल असे निश्चित करण्यात असून सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.