Monday, September 7, 2026
Homeजळगावश्रीकृष्णांच्या संदेश आचरणात आणूया प्रेम एकता आणि संस्कारांनी समाज घडवूया..

श्रीकृष्णांच्या संदेश आचरणात आणूया प्रेम एकता आणि संस्कारांनी समाज घडवूया..

श्रीकृष्णांच्या संदेश आचरणात आणूया प्रेम एकता आणि संस्कारांनी समाज घडवूया..
जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               कुटुंबातील कलह दूर करा . मोबाईल हे ज्ञान आणि प्रगतीचे साधन आहे . वृक्ष लावा नद्या स्वच्छ ठेवा व्यसनमुक्त समाज घडवा.
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून धर्म , प्रेम , कर्तव्य ,सदाचार आणि समाज जागृतीच्या संदेश देणारा पवित्र पर्व आहे .जेव्हा समाजात अधर्म आणि दुष्ट प्रवृत्ती वाढतात तेव्हा ईश्वर अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि अधर्माच्या नाश करतात .
आजच्या काळात श्रीकृष्णांच्या प्रेम आणि एकतेच्या संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे . कुटुंबात परस्पर प्रेम , आदर आणि सन्मान असावा .छोट्या छोट्या कारणांवरून घरात कलह न करता संवादातून प्रश्न सोडवावेत .
मोबाईलच्या योग्य वापर ज्ञान आणि प्रगतीसाठी करावा मात्र त्याच्या अतिरेकामुळे कुटुंबीयांपासून आणि प्रत्यक्ष नात्यांपासून दुरावू नये .
एक झाड लावा ,निसर्ग वाचवा .
जन्माष्टमीच्या निमित्ताने वृक्षरोपण ,पर्यावरण संवर्धन ,आणि नदी जलस्रोत स्वच्छतेच्या संकल्प करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
युवाशक्तीने व्यसनापासून दूर राहून शिक्षण , संस्कार , सेवा आणि समाज हिताच्या कार्यात योगदान द्यावे*.
देव देश धर्मासाठी एकत्र येणे ही काळाची गरज.
समाजात प्रेम बंधुभाव आणि एकता वाढवून देव देश आणि धर्माच्या मूल्यांसाठी सकारात्मक व सेवाभावी भावनेने एकत्र येण्याचे आवाहन या जन्माष्टमीच्या निमित्ताने करण्यात येत आहे .
श्रीकृष्णाची पूजा केवळ मंदिरात नको त्यांचे विचार आपल्या आचरणात आणूया घरात प्रेम , समाजात एकता , निसर्गाची सेवा आणि जीवनात संस्कार हीच श्रीकृष्णांना खरी मानवंदना*…
या आनंदोत्सव च्या शुभ प्रसंगी, नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन , जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, तहसीलदार नाना साहेब आगळे, दीपक तायडे , रवींद्र महाजन, स्वप्नील पाटील, जितेंद्र राजनकर, विश्वनाथ चव्हाण, संजय सूर्यवंशी, दीपक चव्हाण, प्रवीण जाधव, संजय कोळी, रवींद्र पवार, व शेकडो भक्त उपस्थित होते तर दीपक महाराज, सुनील राठोड, बद्रीनाथ पवार, यांनी परिश्रम घेतले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या