Sunday, June 1, 2025
Homeजळगावस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निष्ठावान,तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार.. ;...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निष्ठावान,तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार.. ; मा.आमदार शिरीषदादा चौधरी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निष्ठावान,तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार.. ;
मा.आमदार शिरीषदादा चौधरी.

यावल दि.१८   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील फैजपुर येथे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील,माजी आमदार रमेशदादा चौधरी,जमील शेख,
ज्ञानेश्वर कोळी,काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष संजू जमादार,
यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,रावेर तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील,यावल पंचायत समितीचे माजी सभपती लिलाधर शेठ चौधरी,पंचायत समिती यावल माजी गटनेते शेखर पाटील, लोकप्रिय युवा नेतृत्व धनंजय चौधरी,रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष हरिशशेठ गनवाणी,
जावेद जनाब,हमीदशेठ तडवी,राजू सवरणे,हाजी शब्बीर शेठ,हयात शेठ,रियाज शेख,कलिम मेंबर,
अय्युब मेंबर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका,
जिल्हापरिद,पंचायत समिती निवडणूकांसाठी पक्ष संघटन,
कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी व उमेदवार चाचपणीवर विशेष लक्ष देण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांनी सांगितले.
तसेच माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना व तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असणार आहे असे सांगितले.
तसेच येत्या २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दल,नेव्ही,एअर फोर्स यांनी केलेल्या कर्तबगारीच अभिनंदन करत सैन्य दलाचे मनोबल वाढवण्या करता व सैन्याबद्दल अभिमान व्यक्त करनण्यासाठी धनाजीनाना महाविद्यालय फैजपुर येथील ‘प्रेरणास्तंभ’ पासून ते छत्री चौकातील ‘स्वतंत्रता स्मारक’ पर्यंत “तिरंगा शोभा यात्रा” काँग्रेस पक्षातर्फे २१ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व देशप्रेमींनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संस्थेने उपस्थित रहावे अशी आग्रहाची विनंती काँग्रेस पक्षा तर्फे करण्यात आली आहे..

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या