Saturday, May 31, 2025
Homeजळगावयावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी व आठवडे बाजाराच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढणेची मनसे...

यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी व आठवडे बाजाराच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढणेची मनसे कडून मागणी

यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी व आठवडे बाजाराच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढणेची मनसे कडून मागणी

यावल दि.३०.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               यावल शहरात सुरळीत,मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच आठवडे बाजाराच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढण्याची मागणी मनसे तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावल शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही तरी यावल शहरात पाणीपुरवठा सुरळीत करावा व पाणी पुरवठा संदर्भात जे काही समस्या असेल त्या तात्काळ आपल्या स्तरावर मार्गी लावाव्या व पाणी पुरवठा करणारे कंत्राटदाराकडे लागलेले कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे तरी त्यांचे जे काही महिन्यांचे पगार थकीत बाकी असतील ते तात्काळ देणी करावी व यावलकरांचा पाणी पुरवठा हा सुरळीत करावा तसेच यावल शहरांतील आठवडे बाजार हा अंकलेश्वर- बऱ्हाणपुर गहामार्गावर भरला जातो त्या ठिकाणी मोठे अवजड वाहन हे ये-जा करत असतात व त्यांना जाण्यासाठी खुप कसरत करावी लागते व महिला मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी येत असतात भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.तरी आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे नगरपरिषदेच्या आतल्या जागेत भरत होता व आहे तरी आजु-बाजूस मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण काढल्यास रोडवरील बाजार हा तिथे बसण्यास जागा मोकळी होऊ शकते व तसा अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने निकाल सुद्धा दिलेला आहे तरी आजपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही व यावल शहरात महिलांसाठी प्रसाधन गृह व शौचालय अस्तित्वात नाही तरी बाजारात येणाऱ्या महिलांसाठी व नागरिकांसाठी ही सुविधा आपण नगरपरिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावी तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपणांस सुचित करीत आहोत या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे अशी आपणांस विनंती करतो अन्यथा तसे न झाल्यास महाराष्ट्र निवनिर्माण सेनेमार्फत नागरीक व महिलांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची राहील. मुख्याधिकारी यांना निवेदन देताना
शहरातील नागरिकांसह
गौरव कोळी शहराध्यक्ष, यावल
किशोर नन्नवरे तालुकाध्यक्ष,
शाम पवार उपतालुकाध्यक्ष, चेतन दिलीप अढळकर राज उपाध्यक्ष जनहीत विधी विभाग महाराष्ट्र राज्य इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या