सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामा मध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग कडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप सोनवणे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.