सध्याची पेट्रोल, डिझेल टंचाई, आणि सरकारच्या काही सूचना म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने पुढील काही दिवसांत “लॉक डाऊन” ची “लीट मस् टेस्ट” चाचणी.
शेतकरी आबा पाटील यांचे मत.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – केंद्र व राज्य सरकारच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्याने तसेच पेट्रोल डिझेल टंचाई लक्षात घेता पुढील काही दिवसांत “लॉक डाऊन” च्या तयारी ची “लीट मस् टेस्ट” चाचणी शेतकऱ्यांवर होत असल्याचा संशय शेतकरी बांधवांना येत आहे… असे आत्मचिंतन करणारे मत शेतकरी आबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ऐन शेत मशागतीची वेळी पेट्रोल, डिझेल टंचाईची सर्वात मोठी झळ शेतकऱ्यांना बसत आहे अशा गंभीर प्रसंगी राज्यकर्ते डोळेझाक करून गंमत पहात आहेत. शेतकरी प्रश्नांवर चिडी चूप गप्प बसले आहेत.या महायुती सरकारच्या प्रत्येक अपयशी धोरणांचा सगळ्यात मोठा फटाका हा शेतकरी बांधव यांना बसत आहे.गेल्या १२ वर्षाच्या शासन काळात कोणता शेतकरी सुख समाधानाने जगत आहे ? कृषी खत बियाण्याचा बोगस पना, खालवलेला दर्जा, GST tax, त्यातून अव्वाच्या सव्वा किमतीची रासायनिक खत दर वाढ सुरूच आहे.अनंत अडचणीतून पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. किती शेतकऱ्यांना खरोखर हमी भाव मिळतो.? खरेदी केंद्र वेळेत सुरू होत नाहीत. *ज्या वेळी सुरू होतात त्या वेळी शेतकऱ्यांच्या घरातील सर्व शेतमाल घरातील आजारपण,मुलांचे शिक्षण, व्यापाराची उधार उसनवार देणे याकरिता बाहेर विकून झालेला असतो*.नुकसानीत पीक विम्याची भरपाई मोबदला मिळत नाही. बोदवड तालुक्यातील खरीप हंगाम मधील २ नोहेंबर अतिवृष्टी नुकसानीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.
युद्धाच्या नावाने सरकार स्वतः चे अपयश झाकत आहेत
ऐन, शेती मशागती नांगरणी ,रोटर कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही*. *लोक या डिझेल टंचाई प्रसंगी उद्रेक करतात की “गुमान” *सहन” करून घेतात हीच “लिट मस टेस्ट” सरकार करू पहात आहे*. शेवटी, शेतकरी नाडला जातो. भरडला जातोय हे पाप सरकारचेच आहे.जसे,आरोग्य विज्ञान शिक्षणात बेडूक आणि उंदीर यावर प्रथम शस्त्रक्रिया प्रयोग केले जातात..त्याचा “परिणाम” पाहण्यासाठी तसा सरकारला प्रयोग करायला शेतकरीच सोप्पा असतो* हे नेहमीचेच आहे ..तो मेला काय अंन जगला काय ..याचा सरकारला काही फरक पडत नाही.
बेडूक मरो की उंदीर मरो….
शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष होणारे अन्याय थांबवा ही विनंती सरकारला करतो.. शेवटी उद्रेक हाच पर्याय झाला तर नवल नको .. (आबा पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार बोदवड तालुका.)