राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नी, चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी (दि. 5 जून) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत महिला, एक अल्पवयीन मुलगा आणि एका वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला.
प्राप्त माहितीनुसार, वरणगावजवळील हिरा मारुती परिसरातून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चौघांना एमएच-19 ईव्ही-5353 क्रमांकाच्या भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर दुचाकीवरील सर्वजण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विजय शंकर काळे वय 20, ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30 वर्षे), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14 वर्षे) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय 1 वर्ष) सर्व रा . मलकापूर यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या सर्वाना जळगाव येथील शासकिय वैदयकीय महाविद्यालयात पोहचविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे .



