Saturday, July 18, 2026
Homeजळगावएकविसाव्या शतकातील डिजिटल संवादाची भाषा ठरले इमोजी; विद्यार्थ्यांनी दिला सकारात्मकतेचा संदेश

एकविसाव्या शतकातील डिजिटल संवादाची भाषा ठरले इमोजी; विद्यार्थ्यांनी दिला सकारात्मकतेचा संदेश

एकविसाव्या शतकातील डिजिटल संवादाची भाषा ठरले इमोजी; विद्यार्थ्यांनी दिला सकारात्मकतेचा संदेश

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                      मेहरुण : जागतिक इमोजी दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांनी इमोजींच्या माध्यमातून संवाद, भावना आणि सकारात्मक विचार प्रभावीपणे व्यक्त करणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. “एकविसाव्या शतकातील डिजिटल संवादाची भाषा ठरले इमोजी” या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी आकर्षक इमोजी मानवी साखळी उभारून आनंद, मैत्री, सुसंवाद आणि सकारात्मकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध इमोजींचे फलक हातात घेऊन “हसा, आनंद वाटा, मैत्री जोडा आणि सकारात्मक संवाद साधा” असा संदेश दिला. तसेच इमोजींचा योग्य, सुरक्षित आणि जबाबदारीने वापर कसा करावा, प्रत्येक इमोजीमागील भावना काय असते आणि डिजिटल माध्यमांमध्ये सकारात्मक संवादाचे महत्त्व काय आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी “इमोजी ओळखा – भावना सांगा”, “इमोजीतून गोष्ट तयार करा” आणि “माझा आवडता इमोजी” या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान विद्यार्थ्यांनी विविध इमोजींचे मुखवटे परिधान करून आनंद, प्रेम, सहकार्य, आदर, मैत्री आणि एकता यांसारख्या मूल्यांचे आकर्षक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेमुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला.

याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात इमोजी ही केवळ चिन्हे नसून भावनांची प्रभावी भाषा बनली आहे. योग्य ठिकाणी आणि सकारात्मक हेतूने इमोजींचा वापर केल्यास संवाद अधिक प्रभावी, आनंददायी आणि सुसंवादी होतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, भावनिक अभिव्यक्ती आणि डिजिटल साक्षरता विकसित होते.”

कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक निलेश पवार, मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या इमोजी मानवी साखळीने “हसरा चेहरा, सकारात्मक विचार आणि सुसंवाद” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या