Tuesday, June 24, 2025
Homeआरोग्यभुसावळात नागरी समस्या कायम, सांडपाणी रस्त्यावर नागरीकांची गैरसोय.

भुसावळात नागरी समस्या कायम, सांडपाणी रस्त्यावर नागरीकांची गैरसोय.

भुसावळात नागरी समस्या कायम, सांडपाणी रस्त्यावर नागरीकांची गैरसोय.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ, ता. २३ : भुसावळ येथील खडका चौफुल्ली महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली नालीचे चेंबर जाम झाल्यामूळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच तेथून ये-जा करणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून, सतत चेंबर तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

शहरातील खडका रोड हा भाग उच्चभ्रू नागरीकांचा मानला जातो. या भागातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ गेलेला आहे. याच महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली
परीसरातील रहिवाशांच्या वस्तीचे आणि इमारतींचे सांडपाणी जाण्यासाठी नगरपालिकेने गटारांची व्यवस्था केली आहे. मात्र महामार्गाच्या उड्डाणपुला जवळ

 

नालीतील पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्या मुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर रस्त्यावर वाहात आहे.नालीतील सांडपाणी शहरातून येणाऱ्या व महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, हे घाणीचे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या पाण्याच्या भूमिगत टाक्याही प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मागील काही महिन्यांपासून या समस्येला नागरिक सामोरे जात असुन या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. पालिकेने गटारांची स्वच्छता करावी सांडपाणी जाण्याचे स्त्रोत मोकळे करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.नागरिकांनी यासंदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत मात्र या समस्याचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.चेंबरमधील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी तर पसरली आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.पालिकेच्या संबंधित विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना केल्या जातात त्यामुळे वारंवार चेंबर तुंबण्याची समस्या ही या ठीकाणी कायम आहे. नागरिकांची तसेच वाहनांची येथुन मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहने ये जा करताना नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे. त्यामुळे येथील समस्येची त्वरित दखल घेऊन पालिकेच्या संबंधित विभागाने त्या परिसरातील चेंबर तुंबून घाण पाणी रस्त्यावरून वाहणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

शहरातील खडका चौकातील सांडपाणी संदर्भात पालिकेच्या पथकाने पाहणी केली आहे. नागरीकांची गंभिर समस्या पाहता लवकरच सदर विषय मार्गी लावला जाणार आहे.

रीतेश बच्छाव
नगर अभियंता, भुसावळ नगरपालिका

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या