Sunday, June 22, 2025
Homeभुसावळअपघात झाल्याने खाकीने दुसऱ्या खाकीला पद्धतशीरपणे वाचविले!

अपघात झाल्याने खाकीने दुसऱ्या खाकीला पद्धतशीरपणे वाचविले!

अपघात ग्रस्त मयत झाल्याने; भुसावळ विभागात जोरदार चर्चा!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोमवार दि.१९ रोजी भुसावळ शहराजवळ नॅशनल हायवे क्र.५३ वर राणे नावाचा इसम पायदळ चालत असताना आरटीओच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो इसम जखमी झाला होता त्याला आरटीओ वाहनातील संबंधित कर्मचाऱ्यांनी भुसावल येथील ट्रामा सेंटर मध्ये दाखल करून औषधोपचार सुरू केला.परंतु त्या अपघात ग्रस्ताचे काल निधन झाल्याने अपघात झालेला असताना भुसावळ पोलिसांनी गुन्हा दाखल न करता किरकोळ नोंद केल्याने खाकीने दुसऱ्या खाकीला वाचविल्याबाबत भुसावळ विभागासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्या आरटीओ वाहना बाबत आणि वाहनातील कर्मचाऱ्यांवर जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्यावर पुढील कारवाई काय होते.? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की, दि.१९ रोजी अपघात झाला अपघातग्रस्त चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल असताना पोलिसांना याची खबर, माहिती मिळाली नाही का..? अपघाताची केस असताना डॉक्टरांनी भुसावळ पोलिसांना लेखी स्वरुपात कळविले आहे किंवा नाही.? आरटीओ वाहन कुठून कोणत्या दिशेला जात होते. त्या आरटीओ वाहनाचा चालक हा राज्य परिवहन महामंडळातील एसटी बस चालक असताना त्याची नियुक्ती आरटीओ विभागात केव्हा आणि कोणत्या तारखेपर्यंत झालेली होती..? आरटीओ वाहनात कोण कोण अधिकारी कर्मचारी होते किंवा नाही..? अपघात ग्रस्त व्यक्तीला आरटीओ वाहनातील कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आरटीओ वाहनाचा अपघात झाला याची नोंद / आरटीओ कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे झाली आहे किंवा नाही..? आणि अपघात संदर्भात वाहनासह इतर धावपळीचे व्हिडिओ क्लिप छायाचित्र प्रसिद्धी माध्यमातून व्हायरल झालेले असताना सुद्धा गुन्हा नोंद नाही तसेच त्या अपघाताशी संबंधित अंत्ययात्रेत सुद्धा माणुसकीच्या नात्याने हजर असल्याने आरटीओ वाहनाने अपघात केला आणि त्यात एक इसम दगावला याबाबत भुसावळ पोलिसांकडे कोणी लेखी तक्रार केली नसली तरी भुसावळ पोलिसांना स्वतःहून फिर्यादी होता आले नाही का..? किंवा खाकीने दुसऱ्या घाकीला वाचवण्यासाठी आपल्या अधिकाराचा पदाचा दुरुपयोग केला आहे किंवा कसे याबाबत भुसावळ विभागासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा असून जिल्हा पोलीस अधीक्षक,आणि आरटीओ विभाग प्रमुख याकडे लक्ष केंद्रित करून मयताच्या नातेवाईकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी काय कारवाई करतील याकडे सुद्धा संबंधितांचे लक्ष वेधून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या